Friday, May 21, 2010

ग्रस्त


This was the first poem that I have written. It was on the life of a poor person who lost his entire family in the floods and does not want to live. It was inspired by floods that struck in my town few years back.

जीव हैराण हैराण
जीव उदास उदास
जीवामध्ये जीव परी
नाही जगण्याची आस

वाट चाले अंधारात
उगा बसलो पहात
मी काजव्याची वाट

वाट पहात पहात
पाय शिणले कोन्यात
मन हुंदके देई
कुठेशा आडोश्यात

रात सलत सलत
नाही संपत संपत
सोडली डोळ्यांनी
आता प्रभाताची आस

जीव हैराण हैराण
जीव उदास उदास

पहा तिरडी निघते
रोज ह्या जिवीताची
रोज मरतो परी
मज मरता येत नाही

देह वैरण वैरण
टाका आता ह्याला जाळुन
मयताला आणा
चार-चौघे बोलावून

मातीचा हा देह
आता मातीत जाउ दे
मातिमोल होऊन
या मातीला सोडू दे

जहारीला झाला
आता हरेक माझा श्वास

जीव हैराण हैराण
जीव उदास उदास

Monday, May 17, 2010

कधी कधी एकट असावास वाटत....

कधी कधी एकट असावास वाटत....
अगदी सर्वांपासून लांब ....
बाजूला असु देत फक्त वार्‍याच्या उडत्या भिंती
आणि झाडाचे हिरवे खांब...

आकाशाच्या छताखाली फक्त दोघेच ..
मी आणि माझ्या आठवणी...
अगदी नजर जाईल तितक्या लांब....

एकेक आठवण घेऊन
डोळ्यात काजळाप्रमाणे सजावावी ....
आणि मग हळूच त्यातील एक तिट काढून..
आसामांताचीही नजर काढावी .....
हात धरून वेळेचा तिला म्हणेन ...
एवढी कसली घाई ..अग जरा थांब ....
पळता पळता तुझ्याबरोबर ...बरच काही सांडल ....
उचलू दे क्षण ते सारे ...
आज एकांती निवांत ...अग जरा थांब ..

कधी कधी एकट असावास वाटत....
अगदी सर्वांपासून लांब ....

रसिया बोलत नाही ...

रसिया बोलत नाही
अधरपटल को खोलत नाही
रसिया बोलत नाही

मनमें गाँठ ... बनाए है कुछ
रुत पतझड़की.... सताए है कुछ
सुरसंग काहे मन डोलत नाही
रसिया बोलत नाही

गुलरंग जियासंग ... खेलत नाही
झूठमूठ राज सब... भावत नाही
तोरा संग किसीसंग तोलत नाही
रसिया बोलत नाही

रिमझिम गिर गिर.....बूँद सताए
आँखियॉंका सावन ये....ढल ना पाए
तोरा मुख छीन नैन छोड़त नाही
रसिया बोलत नाही